आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या बऱ्याचशा आर्थिक घडामोडींमध्ये अस लिहिलं गेलं आहे कि बऱ्याचअंशी काळानुसार वाढविलेले पगार अथवा पैसे हे कामगारांसाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. माझ्यामते हि परिस्थिती मागील काही वर्षांपूर्वी खरी होती परंतु आता जग बदलत आहे. बॉस म्हणून वागणाऱ्या मंडळींना असे वाटते कि, जर आपण कामगारांना जास्त पगार दिला तर ते आपल्यासाठी जास्त काम करतात. पण दुर्दैवाने आता ती पद्धत काम करत नाही. कारण हे २१ व शतक आहे. ह्यात फक्त पैशाबाबत विचार करून ठरविलेल्या गोष्टी काहीही उपयोगाच्या नाहीत. यात काहीही दुमत नाही कि पैसा हा सर्वांसाठी महत्वाचा घटक आहे. पण एका ठराविक काळानंतर प्रत्येक व्यक्ती पैसे कमविण्याची एका पातळी गाठली कि तो थोडा निश्चिन्त होतो. म्हणून पैशापेक्षा दुसऱ्या गोष्टींचे महत्व आयुष्यात अथवा कामाच्या ठिकाणी वाढायला सुरु होते.
२१ व्या शतकात कामगारांना कळून चुकले आहे कि वाढत्या तांत्रिकीकरणामुळे व अगदी जोरात बदलणाऱ्या जगामुळे त्यांच्या अनुभवाची किंमत वाढण्याऐवजी वेळेनुसार कमी होत जाते. आता च्या काळात तुमच्या त्रांत्रिक ज्ञानाची किंमत हि दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालली आहे. त्यामुळे जी मंडळी आपल्या क्षेत्रात निष्णात आहेत त्यांना कळून चुकले आहे कि ह्यात टिकून राहण्यासाठी आपले ज्ञान वेळोवेळी वाढविणे हा एकमेव उपाय शिल्लक राहिलेला आहे. ह्या सगळ्यामागील एकच उद्दिष्ठ आहे ते म्हणजे आपल्या अनुभवाची किंमत कमी होण्यापूर्वी आपण काहीतरी शिकून त्याच्यापुढे जाणे व क्षेत्रातील नवनवीन गोष्टींना आत्मसात करणे. त्यामुळे पगार वाढीपेक्षा जुन्या अनुभवांमध्ये त्याच्या क्षेत्राशी संबंधित नवा अनुभव जोडल्याने त्या व्यक्तींना जास्त संतुष्टता भेटते. ह्याचा परिणाम असा होतो कि तुम्ही तुमच्या क्षेत्रात ते व्यक्ती कायमच पुढे राहतात आणि जरी त्यांचे प्रत्यक्ष उद्दिष्टे पैसे कमविणे नसले तरी वाढीव अनुभवामुळे पैसे आपोआपच वाढत जातात. त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा पाहतो, जो प्रतिभावान व्यक्ती/कामगार कधी कधी नव्या नोकरीत कमी पगार असूनही आपली जुनी नोकरी सोडून जातात . बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो कि पैसा हाच सर्वस्व असतो आणि पैशासाठी लोक काहीही करू शकतात.आता हा गैरसमज दूर करण्याची वेळ आलेली आहे. आता आपण कामगाराला आपल्याला माहित असलेले काम करण्यासाठी कामावर ठेवणार नाही. मग, आता हि कल्पना पूर्णपणे बदललीय. आजच्या काळात आपल्याकडे असे लोक कामाला लागतात ज्यांच्या कामाविषयी आपल्याला काहीही कल्पना अथवा ज्ञान नसते. जरी आपण त्यांचे बॉस/ मॅनेजर म्हणून काम करत असलो तरी. ह्या काही अशा गोष्टी आहेत ज्या Peter Drukker नामक व्यवस्थापकीय सल्लागाराने बऱ्याच वर्षे आधी लिहून ठेवलेले आहे .
Peter Drucker, यांच्या मते भविष्यातील व्यवस्थापकाला गोष्टी कश्या करायच्या सांगण्यापेक्षा गोष्टी कश्या करणार यावर भर द्यावा लागेल. हे आता सर्व व्यवस्थापकांना व मालकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे कि कामगारांनाही त्यांच्या व्यवस्थापकापेक्षा त्यांच्या कामाबद्दल जास्त ज्ञान असू शकते. आणि याबाबत व्यवस्थापकांनी जास्त घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या कामाची पद्धती वेळेप्रमाणे बदलावी व नवनवीन रूपात कामगारासोबत आपले नटे घट्ट करावे. जे घमंडी व स्वतः ला अतिहुशार समजल्या जाणाऱ्या व्यवस्थापकांना हे समजून घेण्याची गरज आहे कि स्वतः मधील ह्या स्वभावाला आता सोडण्याची वेळ आलेली आहे. व आपल्याला आपल्या कामगारांपेक्षा जास्त माहिती असावे हा हट्ट सोडला पाहिजे.मी तुमच्यापेक्षा अधिक जाणतो, हा असा एका असा भ्रम आहे ज्यात व्यवस्थापकाला वाटते कि मला तुझ्याही कामाबद्दल माहिती आहे आणि तुला जे माहिती नाही ते हि मला माहिती आहे . अशा पुरातन विचारांमुळे आणि व्यवस्थापकीय संकल्पनेमुळे कोणत्याही संघटनेत सकारात्मकता राहत नाही. त्याचसोबत कामगारांच्या काम करण्याची क्षमता आणि उत्साह यांच्यावरही नकारात्मक प्रभाव करतो.याचा सर्वांचा प्रत्यक्ष्य अथवा अप्रत्यक्षपणे परिणाम संघटनेच्या अथवा कंपनीच्या सार्वत्रिक विकासावर पडतो. म्हणून लक्षात घ्या, काळाप्रमाणे बदलणारा व्यवस्थापक हा उत्तम व्यवस्थापक म्हणून नावारूपास येतो आणि त्याहून हि अधिक तो स्वतः म्हणजेच एका टीम म्हणूंन कायम पुढे असतो.
धन्यवाद.
लेखन –
श्री मनोज इंगळे
संस्थापक- उद्योगमंत्र मराठी